पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वारीच्या वाटेवर

 गेली दोन वर्षे कोरोनाच्या छायेत गेल्यावर यावर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये वारक-यांची मांदियाळी पहायला मिळतेय. वारी पूर्ववत पार पडल्याचा आनंद आहेच पण या २०/२१ दिवसांत एकदाही वारीत सहभागी होता आलं नाही याचं वाईट वाटतयं..         लहानपणापासूनच मी वारी अगदी जवळून अनुभवत आलेय. वाल्ह्यात माऊलींच्या पालखीला नगरप्रदक्षिणा व्हायची तेव्हा तो सोहळा आमच्या दुकानात बसून मी अनेकदा अनुभवलाय.  नंतर दोन किलोमीटरचा रस्ता चालत जायचं आणि  भेंडीबाजारच्या मैदानावर जाऊन पालखीचं दर्शन घ्यायचं. संध्याकाळी  मम्मीच्या आजोळच्या दिंडीत जेवण करुन परत यायचं हा शिरस्ता होता.   पुण्यात शिक्षणासाठी आल्यावर तुकारामांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात जायचो..   रिपोर्टर म्हणूनही जवळपास सात वर्षे वेगवेगळ्या टप्प्यांवर वारी कव्हर केली. सलग दोन वर्षे वारीचं आळंदी ते पंढरपूर असं कव्हरेज केलं. एकूणच काय तर अगदी काही वर्षांचा अपवाद वगळता हा आयुष्यातल्या प्रत्येक वर्षी हा सोहळा अनुभवला...  त्यामुळे वारीसाठी मनातला एक स्पेशल कप्प...

अध्याय पहिला !

  नमस्कार !  मी अश्विनी पवार. गेल्या दहा वर्षांपासून मी पत्रकारितेमध्ये कार्यरत आहे. त्यातील सर्वात जास्त म्हणजेच सात वर्ष 'झी 24 तास' या मराठी वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं. 2019 मध्ये झी मधील नोकरी सोडल्यानंतर काही काळ पुर्णवेळ गृहिणी होते. स्वत:चं काही सुरु करता येईल का ?   याचीही चाचपणीही केली. पण ओढा कायम पत्रकारितेकडेच राहिला. काही दिवस पेपरमध्ये लिखाण केलं, त्यावेऴी ब्लॉग सुरु करण्याचा विचार पहिल्यांदा मनात आला. पण तो प्रत्यक्षात उतरवता आला नाही. कारण आपल्याला  जमेल की नाही ही शंका होती. अधुन मधून फेसबुकवर लिहीत होते. ते वाचून  नवरा ,  सहकारी ,  मित्र-मैत्रिणी यांनीही अनेकदा  ' लिहीत जा ' असा  आग्रह केला. त्यामुळे काही वर्षांपूर्वी ब्लॉग सुरु करण्याचं मनावर घेतलं. पण माझी टेक्निकल बाजू थोडी कमकुवत असल्यानं डोमेन पासून सुरवात होती. 2020 मध्ये नीतिक्षाचा जन्म झाला आणि सगळ्याच प्रायोरिटीज बदलल्या त्यामध्ये ब्लॉग तर अगदीच मागॆ पडला. जे काही थोडं फार लिखाण व्हायचं तेही फेसबुकच्या वॉलवर. मुलीचं करण्यात 1.5 वर्ष पटकन उडून गेल...