पोस्ट्स

आईच्या नोकरीची वर्षपूर्ती...

दहा दिवसांच्या सुटीनंतर आठवड्याची सुरुवात झाली ती मिटींग्ज, निकालाच्या  बातम्यांचे प्लँनिंग, आठवड्याच्या बातम्या या विषयाने..शिवाय भल्या मोठ्या सुट्टीनंतर मी 'मंडे ब्लू' मध्येच होते ..दिवस सरता सरता आठवलं अरेच्चा 'सकाळ' मध्ये कामाला सुरुवात करून वर्ष लोटलं सुध्दा.. ३ जून २०२३ नेमकी वटपौर्णिमा होती.  निगडीच्या मॉडर्न हायस्कूलमधला पहिला दिवसही वटपौर्णिमेचाच..मी कधी फार वटपौर्णिमेची पूजा केली नसली तरी काहीतरी कनेक्शन आहे असं मला सतत वाटतं..तसं आजही वाटून गेलं. झी २४ तास सोडल्यानंतर मी थेट सई  दीड वर्षांची झाल्यानंतर जॉब करण्याचा निर्णय घेतला.. गेल्या वर्षी मे मध्ये 'सकाळ' मधून मुलाखतीसाठी फोन आला. मुलाखत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होता होता समजलं की लगेचच जॉईन व्हावं लागणार. आनंदाने आणि काळजीने पोटात गोळा आला..लगेच जॉईनिंग म्हणजे आता सई आपल्याजवळ दिवसभर नसणार ,  दिवसभर डे केअरला राहिल का ? माझ्याशिवाय झोपेल का? जास्त वेळ मी दिसले नाही तर रडेल का ?? एक ना अनेक प्रश्न.. एकीकडे करिअर पुन्हा सुरू  होतयं हे समाधान दुसरीकडे सईला वेळ देता येईल का याचं गिल्ट...करिअरच्या सुरु...

स्तनपानाविषयी बोलू काही

 गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दुस-यांदा लॉकडाऊन लागला.  त्याचवेळी आमच्या घरात कोरोनाचे पेशंट असल्यानं आम्ही सगळेच क्वारंटाईन होतो.  नीतिक्षा तेव्हा साधारणत: साडेपाच महिन्यांची होती.  लॉकडाऊनमुळे ब-याचशा नातेवाईकांनी नीतिक्षाला व्हिडीओ कॉलवरच पाहिलेलं.  तिच्याशी गप्पाही तिथेच व्हायच्या. एकदा माझ्या आजोबांशी व्हिडीओ कॉल सुरु असताना ते अचानक मला म्हणाले,  ' पहिले सहा महिने बाळाला आईचंच दुध द्यायचं असतं, तू तो टप्पा गाठलास.   त्याबद्दल तुझं अभिनंदन ! ' त्यांची ही शाबासकी ऐकून मला भरुन आलं. कारण माझ्या आजुबाजूला असणा-या कोणत्याही व्यक्तीने याबाबतीत माझं कौतुक केलं नव्हतं. पण, नको असलेले सल्ले मात्र पावलोपावली मिळत होते.  माझे आजोबा ग्रामविकास अधिकारी होते, फक्त मॅट्रिक पास आजोबांना कदाचित त्यांच्या पेशामुळे स्तनपान किंवा ब्रेस्टफिडींग बद्दल माहिती होती, आहे.  पण स्वतःला उच्चशिक्षित म्हणवणाऱ्या आणि  सतत इंटरनेट हाताशी असणा-या त्यांच्या पुढच्या पिढीच्या मात्र याबाबतीत अनेक गैरसमजूती आहेत. यामुळेच स्तनपान या विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी ...

वारीच्या वाटेवर

 गेली दोन वर्षे कोरोनाच्या छायेत गेल्यावर यावर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये वारक-यांची मांदियाळी पहायला मिळतेय. वारी पूर्ववत पार पडल्याचा आनंद आहेच पण या २०/२१ दिवसांत एकदाही वारीत सहभागी होता आलं नाही याचं वाईट वाटतयं..         लहानपणापासूनच मी वारी अगदी जवळून अनुभवत आलेय. वाल्ह्यात माऊलींच्या पालखीला नगरप्रदक्षिणा व्हायची तेव्हा तो सोहळा आमच्या दुकानात बसून मी अनेकदा अनुभवलाय.  नंतर दोन किलोमीटरचा रस्ता चालत जायचं आणि  भेंडीबाजारच्या मैदानावर जाऊन पालखीचं दर्शन घ्यायचं. संध्याकाळी  मम्मीच्या आजोळच्या दिंडीत जेवण करुन परत यायचं हा शिरस्ता होता.   पुण्यात शिक्षणासाठी आल्यावर तुकारामांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात जायचो..   रिपोर्टर म्हणूनही जवळपास सात वर्षे वेगवेगळ्या टप्प्यांवर वारी कव्हर केली. सलग दोन वर्षे वारीचं आळंदी ते पंढरपूर असं कव्हरेज केलं. एकूणच काय तर अगदी काही वर्षांचा अपवाद वगळता हा आयुष्यातल्या प्रत्येक वर्षी हा सोहळा अनुभवला...  त्यामुळे वारीसाठी मनातला एक स्पेशल कप्प...

अध्याय पहिला !

  नमस्कार !  मी अश्विनी पवार. गेल्या दहा वर्षांपासून मी पत्रकारितेमध्ये कार्यरत आहे. त्यातील सर्वात जास्त म्हणजेच सात वर्ष 'झी 24 तास' या मराठी वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं. 2019 मध्ये झी मधील नोकरी सोडल्यानंतर काही काळ पुर्णवेळ गृहिणी होते. स्वत:चं काही सुरु करता येईल का ?   याचीही चाचपणीही केली. पण ओढा कायम पत्रकारितेकडेच राहिला. काही दिवस पेपरमध्ये लिखाण केलं, त्यावेऴी ब्लॉग सुरु करण्याचा विचार पहिल्यांदा मनात आला. पण तो प्रत्यक्षात उतरवता आला नाही. कारण आपल्याला  जमेल की नाही ही शंका होती. अधुन मधून फेसबुकवर लिहीत होते. ते वाचून  नवरा ,  सहकारी ,  मित्र-मैत्रिणी यांनीही अनेकदा  ' लिहीत जा ' असा  आग्रह केला. त्यामुळे काही वर्षांपूर्वी ब्लॉग सुरु करण्याचं मनावर घेतलं. पण माझी टेक्निकल बाजू थोडी कमकुवत असल्यानं डोमेन पासून सुरवात होती. 2020 मध्ये नीतिक्षाचा जन्म झाला आणि सगळ्याच प्रायोरिटीज बदलल्या त्यामध्ये ब्लॉग तर अगदीच मागॆ पडला. जे काही थोडं फार लिखाण व्हायचं तेही फेसबुकच्या वॉलवर. मुलीचं करण्यात 1.5 वर्ष पटकन उडून गेल...